शाळा पुन्हा गजबजणार
मार्च दोन हजार वीस पासून राज्यात शाळा कोरूना मार्गामुळे बंद आहेत. आता लवकरच शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र राज्यातील बहुतांशी भागात सध्या कोरोना रोखण्याची संख्या झपाट्याने कमी झाली असून प्रादुर्भाव देखील नियंत्रणात असल्याचे दिसून आले आहे या पार्श्वभूमीवर सध्या ८ वी १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. उरित वर्ग लवकरच सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत १ ऑगस्टला ब्रेक द चैन अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला आलेला आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पहिली बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांची भेट घेतली
बैठकीनंतर प्रसार माध्यमाची बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की 16 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा विचार आहे. निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक आहे. त्यात यावर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश आल्यावर त्याची अंमलबजावणी होईल, असंही गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान सीएसआर फंडातून राज्य सरकारकडून ४७१ शासकीय शाळांचे परिवर्तन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात सीएसआर फंडातून ४७१ शाळेचे परिवर्तन होणार आहे या शाळांमध्ये अत्याधिक शैक्षणिक सुविधा. इमारत आणि इतर सुविधा उपलब्ध असणार आहेत. दरम्यान. येत्या १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत असे उद्धव ठाकरे म्हणाले.